अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला आहे.
सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचा निर्माण कार्य बंद होतं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळमना मार्केटकडे जाणाऱ्या भारतनगर चौकात ही दुर्घटना घडली.

पुल पडण्याच्या वेळी अवघ्या सेकंदाच्या फरकाने तेथून एक कार पुर्ण कुटूंबासह गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हे कुटूंबीय थोडक्यात या दुर्घटनेतून बचावले असंच म्हणता येईल,
त्याचबरोबर निर्माणाधीन पुल कोसळल्याने विरोधी पक्षाकडून नितीन गडकरी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान ही घटना कशी घडली याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पुलाच्या पिल्लरवर स्पॅन बेअरींग करण्यासाठी त्याला उचलण्यात येत होतं.
त्यावेळी स्पॅन घसरून ही घटना घडली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याने चिंता काही प्रमाणात कमी व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेनंतर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी पोहोचले. दुर्घटनेची तांत्रिक दृष्टिकोनातून तज्ञांकडून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करू अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.
घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम