Thane News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल नाही का ? जर तुमचेही असेच स्वप्न असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे, विशेषता ज्यांना ठाण्यात घर खरेदी करायचे आहे अशा नागरिकांसाठी आजची बातमी आनंदाची राहणार आहे.
खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता म्हाडाच्या घरांच्या आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाकडून ठाण्यात वीस लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) प्रथानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांच्या किमती ठरवल्या जाणार आहेत. यानुसार, शिरगाव आणि खोनी भागात असणाऱ्या 6 हजार 248 घरांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती मिळेल रिपोर्ट मधून समोर आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कोकण मंडळाच्या ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ योजनेअंतर्गत ठाण्यातील शिरगाव व खोनी परिसरात स्वस्तात घरं उपलब्ध करून दिली जात आहेत आणि यामुळे या भागात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या भागातील घरांसाठी किती सुधारित किमती निश्चित करण्यात आल्या आहेत याची माहिती पाहणार आहोत.
सुधारित किंमती कशा आहेत ?
या योजनेत एकूण 6 हजार 248 घरांची विक्री करण्यात येणार आहे. या घरांच्या सुधारित किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खोनी येथील घरांची किंमत एक लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि येथील घरांची सुधारित किंमत 19 लाख 11 हजार एवढी आहे.
दुसरीकडे शिरगाव येथील 5 हजार 226 घरांच्या किंमतीस मंजुरी मिळाली असून, येथील घराची सुधारित किंमत 19 लाख 28 हजार रुपये इतकी आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-Urban) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीसाठी आहेत.
वार्षिक उत्पन्नानुसार अर्जदारांचे वर्गीकरण करण्यात आले असून, EWS, LIG, MIG व HIG या श्रेणींमध्ये अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती यावेळी समोर आली आहे.
हे घर घेण्यासाठी अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. नक्कीच ठाण्यासारख्या शहरात जर घर खरेदी करायची असेल तर म्हाडा कडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही योजना एक सुवर्णसंधी राहणार आहे.