महाराष्ट्र आणि पंजाबमधील 2 बँकांचे लायसन रद्द केल्यानंतर RBI ची देशातील ‘या’ दोन मोठ्या बँकांवर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीआयकडून अवघ्या चार दिवसांच्या काळात देशातील दोन महत्त्वाच्या सहकारी बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. सुरुवातीला RBI ने 22 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सहकारी बँकेचे लायसन रद्द केले आणि त्यानंतर 25 एप्रिलला आरबीआयने पंजाब मधील एका सहकारी बँकेचे लायसन रद्द करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता देशातील आणखी दोन महत्त्वाच्या वित्तीय संस्थांवर आरबीआयने कठोर कारवाई केलेली आहे.

Published on -

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काही महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई केली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला असून यामुळे सध्या संबंधित कारवाई झालेल्या बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्त्वाचे म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या महाराष्ट्रातील बँकांवर सुद्धा कारवाई केलेली आहे. गेल्या काही महिन्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातील काही सहकारी बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. खरे तर, आरबीआयने 22 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेचे लायसन रद्द केले.

छत्रपती संभाजी नगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून घेण्यात आला आणि यामुळे या संबंधित बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले. आरबीआयने बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आणि कमाईचे कोणतीच शक्यता दिसत नसल्याने अजिंठा अर्बन कॉपरेटिव बँकेचा परवाना रद्द केला.

दरम्यान राज्यातील या मोठ्या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या काळातच आरबीआयकडून आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल 2025 रोजी पंजाब राज्यातील जालंधर येथील इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

या बँकेचा परवाना रद्द करताना देखील आरबीआयने बँकेकडे पुरेसं भांडवल नसल्याने आणि कमाईची शक्यता नसल्यानं हे पाऊल उचलल असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या बँकेची आर्थिक परिस्थिती फारच खराब होती आणि म्हणून जर या सहकारी बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे सुद्धा सुरू ठेवण्याची परवानगी दिली असती तर ठेवेदारांचे नुकसान होण्याची शक्यता होती.

हिच गोष्ट विचारात घेऊन आरबीआयकडून पंजाबच्या रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज यांना ही बँक बंद करण्याचे आणि बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्याची विनंती नुकतीच करण्यात आली आहे. एकंदरीत आरबीआयने या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला

आणि यामुळे संबंधित बँकेच्या खातेधारकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये सध्या मोठे अस्वस्थतेचे वातावरण दिसत आहे. एकीकडे अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशातील दोन सहकारी बँकांचे लायसन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआयने आता देशातील दोन महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.

कोणत्या बँकांवर झाली दंडात्मक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस या NBFC कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. खरंतर, आरबीआय देशातील सर्व सरकारी, सहकारी, खाजगी तसेच एनबीएफसी कंपन्यांवर लक्ष ठेवून असते आणि आरबीआयचे नियम या वित्तीय संस्थांना पाळावे लागतात.

ज्या बँका किंवा एनबीएफसी या नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर आरबीआय कडून कारवाई होते. तसेच बँकेची आर्थिक स्थितीला डबगाईला गेल्यावर आरबीआयकडून बँकेचे लायसन्स सुद्धा रद्द केले जाते. दरम्यान इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रकरणात आरबीआयच्या नियमांचे पालन झालेले नव्हते

आणि याचमुळे इंडियन बँकेकडून 1.61 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला 71.30 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे संबंधित वित्तीय संस्थेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पण आरबीआयची ही कारवाई बँकेवर आहे यामुळे ग्राहकांवर याचा कोणताच परिणाम होणार नाही, दंडाची रक्कम स्वतः बँकेला भरायची आहे, ग्राहकांकडून ही रक्कम वसूल होणार नाही यामुळे त्यांनी कोणतीच चिंता करू नये असे आवाहन जाणकार लोकांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News