Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातोय.
याचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळतोय. या योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असून ही योजना अगदीच कमी दिवसाच्या काळात लोकप्रिय झाली आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत आहे.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्ते देण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च यां 9 महिन्यांचा लाभ त्यांना मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी एप्रिल महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
म्हणजेच 30 एप्रिलच्या सुमारास लाडक्या बहिणींना या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळू शकतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती मधील नेत्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आम्ही आमचे सरकार पुन्हा आल्यास 2100 रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र अजून 2100 रुपयांबाबत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आता या योजनेच्या बाबत उलट सुलट चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. विरोधकांच्या माध्यमातून ही योजना लवकरच गुंडाळली जाईल असा दावा केला जातोय. तसेच काही विरोधक या योजनेसाठी अनेक दुसऱ्या योजनांचा पैसा वळवला जातोय असा आरोपही करत असून
यामुळे सध्या लाडकी बहिणी योजना चर्चेत आली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी रत्नागिरीत या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांना याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी मध्ये बोलताना असे सांगितले आहे की मी अर्थसंकल्प सादर करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता आपल्या राज्याचा विकास थांबणार नाही. राज्याचा विकास अशाच पद्धतीने होत राहणार आहे. दुसरीकडे यावेळी त्यांनी विरोधकांवर मोठा हल्लाबोल सुद्धा केला ते म्हणालेत की, ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक अनेक गैरसमज पसरवत आहेत.
पण लाडक्या बहिणींनी चिंता करू नये कारण की ही योजना चालूच राहणार आहे. या योजनेबाबत अधिक माहिती देताना ते असे म्हणाले की, ही योजना अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी सुरु झाली आहे. पण यावेळी त्यांनी एका गोष्टीचा विशेष उल्लेख केला ती म्हणजे एका योजनेचा लाभ घेतल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाही.
म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी इतर योजनांचा लाभ घेत असतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही असे उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून राज्यातील पात्र महिलांना भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट दिली आहे. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या वतीने ही योजना सुरूच राहील, असे सुद्धा आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.