एसटी प्रवाशांसाठी गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन भव्य दुमजली बसस्थानक ! 11 मे रोजी होणार उदघाट्न

महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील एक नव्याने बांधण्यात आलेले महत्त्वाचे बसस्थानक सर्वसामान्यांसाठी लवकरच खुले होणार आहे. 11 मे 2025 रोजी या नव्या बसस्थानकाचे उद्घाटन होणार आहे. 

Published on -

Maharashtra ST News : तुम्ही, आम्ही कधी ना कधी लालपरीने प्रवास केला असेल. महाराष्ट्रात दररोज लाखोंच्या संख्येने लोक एसटीने प्रवास करतात. यामुळे एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा यांसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात विविध ठिकाणी नवनवीन बसस्थानक सुद्धा विकसित केले जात आहेत.

अशातच कोकणातील रत्नागिरी शहरातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रत्नागिरी शहरात मध्यवर्ती बस स्थानक विकसित करण्यात आले असून हे स्थानक लवकरच सर्वसामान्य एसटी प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे.

कधी सुरु होणार नवीन बसस्थानक ?

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे आणि येत्या चार दिवसांनी हे बस स्थानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे. 11 मे 2025 रोजी रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचे लोकार्पण केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

या बसस्थानकाचे काम ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हाती घेण्यात आले होते त्यांनी अवघ्या सव्वा वर्षाच्या रेकॉर्ड टाइमिंग मध्ये हे बस स्थानक बांधून तयार केले आहे. मात्र त्याआधी या बसस्थानकाचा प्रकल्प जवळपास पाच वर्ष रखडला सुद्धा होता.

पण, आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि येत्या चार दिवसांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असल्याने एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होईल अशी आशा आहे.

कसे आहे बसस्थानक?

या बसस्थानक प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प 17 कोटी 50 लाख रुपयांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे बस स्थानक दूमजली आहे. या भव्य बसस्थानकात दोन कँटिन, दोन पोलिस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

या स्थानकाच्या तळ माळ्यावरून शहरी बससेवा चालवली जाणार आहे, तर पहिल्या माळ्यावरून मुंबई-पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवेसाठी ग्रामीण बसस्थानक विकसित झालेले आहे. यातील तळमाळ्यावर 18 आणि पहिल्या माळ्यावर 6 गाळे तयार करण्यात आले आहेत.

एकंदरीत कोकणातील रत्नागिरी येथे तयार करण्यात आलेल्या या स्थानकामुळे रत्नागिरी येथून एसटीने ये – जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.

खरे तर हे बसस्थानक कधीपर्यंत तयार होणार असा प्रश्न रत्नागिरी करांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जात होता. पण, आता रत्नागिरीकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे 11 मे 2025 रोजी रत्नागिरी येथील मध्यवर्ती बसस्थानक सर्वसामान्यांसाठी खुले होणार असल्याची बातमी हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News