महाराष्ट्रातील ‘ही’ महत्वाची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बंद होणार ?

महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ब्रेक लागणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. पण, यातील एक गाडी आता बंद होऊ शकते ? या नव्या चर्चेने जन्म घेतला आहे.

Published on -

Maharashtra Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील 2019 मध्ये सुरू झालेली स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि यानंतर या गाडीचे देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले. मीडिया रिपोर्टनुसार सध्या स्थितीला देशातील 76 हून अधिक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

आगामी काळात या गाडीचे नेटवर्क आणखी वाढवले जाणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातून सध्या स्थितीला 11 गाड्या सुरू आहेत. आगामी काळात मुंबई, पुणे, शेगाव, कोल्हापूर, धुळे यांसारख्या शहरांना आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळण्याची शक्यता आहे.

सध्या स्थितीला मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

दरम्यान यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पावसाळ्यात बंद केले जाईल की काय अशा चर्चा सध्या सुरू आहेत. खरेतर, कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी पावसाळी काळात नवं वेळापत्रक लागू होत असतं.

यंदाही पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे पण त्याआधीच या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस गाड्या यंदाच्या पावसाळ्यात धावतील की नाही? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. कारण की रेल्वेच्या संकेतस्थळावर 15 जून नंतरचे वंदे भारत एक्सप्रेस आणि इतर एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण सुरू नसल्याची वास्तविकता समोर आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) संकेतस्थळावर अजूनही 15 जून 2025 नंतरचे सीएसएमटी – मडगाव वंदे भारत (22229/22230), तेजस एक्स्प्रेस (22119/22120) आणि एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस (11099/11100) या गाड्यांचे आरक्षण उपलब्ध नाहीये.

यामुळे यंदा पावसाळी वेळापत्रकांमध्ये या गाड्या समाविष्ट राहणार की या गाड्या रद्द केल्या जाणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना अस्वस्थ बनवत आहेत. वास्तविक, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास पावसाळ्याच्या काळात फारच रिस्की बनतो. यामुळे कोलाड – ठोकूर या 740 किमी पट्ट्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू केलं जातं.

या काळात दरडी कोसळणं, दृश्यमानता कमी होणं यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक असतं आणि यानुसार पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वे कडून जाहीर केलं जातं. मात्र, यंदाचे पावसाळी वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. अन यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सह इतर गाड्यांचे पावसाळ्यातील आरक्षण अजून सुरू नसल्याचे दिसते.

दरम्यान, आरक्षण बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी गाड्यांची निवड करावी लागत आहे. तसेच सुपरफास्ट गाड्यांचा वेग कमी असूनही अधिभार घेतला जात असल्याने प्रवासी नाराज असल्याची माहिती प्रवासी संघटनांकडून दिली जात आहे. दुसरीकडे, कोकण रेल्वे प्रशासनाने पुढील आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावरील 2025 चे पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.

दरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याकडून असे सांगितले गेले आहे की कोकण रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पावसाळी वेळापत्रक अद्ययावत झाले की मग या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या वेळा जाहीर होतील. दरम्यान हे सारं काही झालं की मग लगेचच प्रवाशांना तिकीट आरक्षण करता येणार आहे.

म्हणजेच सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस पावसाळी काळात रद्द राहणार नाही पण सध्या या गाडीसाठी 15 जून नंतरचे आरक्षण सुरूच नाहीये. पण येत्या काही दिवसांनी हे आरक्षण सुद्धा सुरू होणार आहे आणि यामुळे नक्कीच मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News