मुंबई-गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! महामार्गावरील कशेडी बोगद्याचे ‘या’ तारखेला उदघाट्न , आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात

मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे कारण की मुंबई - गोवा प्रवास वेगवान बनवण्याची क्षमता ठेवणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

Published on -

Mumbai – Goa Highway : मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गोव्याला जाणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आनंदाची राहणार आहे.

खरंतर सद्यस्थितीला मुंबई गोवा प्रवास फारच आव्हानाचा बनला आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास फारच कठीण बनतो आणि खराब रस्त्यांमुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. रस्त्याच्या सध्याच्या परिस्थितीत अपघात होण्याची भीती देखील अधिक असते.

पण आता लवकरच मुंबई गोवा सुपरफास्ट होणार आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील एका महत्त्वाच्या बोगद्याचे लोकार्पण लवकरच होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे हो कोकणात उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला कशेडी घाट बोगदा अखेर 15 मे 2025 पासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी हा बोगदा सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

बोगद्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात 

 जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा बोगदा पोलादपूर (रायगड) ते कशेडी (खेड, रत्नागिरी) दरम्यान विकसित केला जात आहे. त्याची लांबी ही दोन किलोमीटर इतके असून आता याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, या बोगदा प्रकल्पांतर्गत पोलादपूर टोकाकडील वीजपुरवठा सुद्धा सुरू करण्यात आला आहे आणि उर्वरित विद्युत कामे पुढील 15 दिवसांत पूर्ण होतील. म्हणजेच 15 मे पर्यंत हा बोगदा पूर्ण होईल आणि त्यानंतर याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

तसेच बोगद्यामधील किरकोळ गळती दूर करण्याचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. खरे तर या बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास फारच वेगवान होणार आहे. सध्या कशेडी घाटात 40 ते 45 मिनिटांचा वेळ जातो पण हा बोगदा सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी फक्त दहा मिनिटांवर येणार आहे.

कारण की, बोगदा आणि त्यास जोडणारा 9 किमीचा नवीन मार्ग घाट वळणाचा त्रास कमी करणार आहे. बोगद्यात आणि लगतच्या मार्गांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 200 स्ट्रीटलाईट्स बसवण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व उपकरणे दाखल झाली असून, पुढील तीन आठवड्यांत त्यांची उभारणी पूर्ण होणार असा दावा करण्यात आला आहे.

24 तास वीजपुरवठा आणि उत्कृष्ट व्हेंटिलेशन यामुळे बोगद्यात प्रवास अधिक सुरक्षित राहील. या बोगद्यात पावसाळ्यापूर्वीची गळती थांबवण्यासाठी ग्राऊटिंग तंत्रज्ञान वापरले जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

यामुळे पाण्याची गळती रोखता येणार आहे आणि बोगद्यातील रस्ता खराब होण्याचा धोका कमी होईल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे. नक्कीच मुंबई गोवा महामार्गावरील हा प्रकल्प सुरू झाला तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News