खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले दुसर्‍या पक्षात जाण्याची गरज नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील … Read more

शेतकर्‍यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- देशाच्या संरक्षणासाठी के. के. रेंज प्रकल्प आवश्यक असला तरी याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकल्पबाधित 23 गावांतील शेतकर्‍यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही, त्यांचा प्रपंच हाच माझा प्रपंच आहे. आपण केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून गोंधळाचे वातावरण संपवून वस्तुस्थिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवू, असे आश्‍वासन खा. डॉ. सुजय … Read more

बस झाले आता मी उपोषणालाच बसतो !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा हस्तांतरित करताना नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने काही नवीन नियम घातले आहेत. त्या माध्यमातून ते उड्डाणपुलाच्या कामात नाहक आडकाठी घालत आहेत.  जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर मी खासदार या नात्याने थेट दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  … Read more

खा.सुजय विखे म्हणतात मलई कमवायची असेल तर मंत्री होण्याऐवजी ठेकेदारच व्हा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे खासदार सुजय विखे यांनी समर्थन केले. खातेवाटपावरून वाद कशासाठी, मलईदार खाते मिळवून मलई कमवायची असेल, तर त्यांनी मंत्री होण्याऐवजी ठेकेदारच व्हावे, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना … Read more

आई-वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नव्हे तर सर्वसामान्यांचे नुकसान- खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात आपल्या आई – वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नुकसान झाले नसून सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा दावा खासदार डॉ . सुजय विखे यांनी केला. नगरपालिकेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते. आपण देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले हे सरकार एक वर्षही टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात सत्तेसाठी तीन, तर जिल्हा परिषदेत चार पक्ष एकत्र आले. राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला याचा जाब विचारू. एक वर्षाचा कार्यकाळसुद्धा हे सरकार पूर्ण करू शकणार नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले … Read more

तेरी भी चुप मेरी भी चुप अशी भूमिका योग्य नव्हे – खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  कुकडीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे घेतली. २०१६ च्या शासन निर्देशानुसार लोकसभा सदस्य या समितीचा सदस्य आहे. मात्र, या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळाले नाही. पाच लोक बसून पाच लाख लोकांसाठी महत्वाचा असलेला निर्णय घेऊ शकत नाहीत. कुकडीच्या प्रश्नात पक्षीय राजकारण नको. आज पावेतो कुकडीचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही. … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती राष्ट्रवादीने केली होती. त्यामुळे आम्ही माघार घेतली. पण केवळ एका निवडणुकीवरून कुणी राजकीय अंदाज बांधू नये. जिल्ह्यातील राजकीय गणितांचा भविष्यात उलगडा होत जाईल. ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही.आगामी काळात आमचा वेगळा पॅटर्न दिसेल, असे खासदार डॉ. सुजय विखे … Read more

विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मोठा फटका बसला आहे. दिग्गज आमदारांचा पराभव झाला, या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आला. आज या संदर्भात पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय … Read more

जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न राबवायचा हे आज सांगणार नाही – खासदार सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कोणता पॅटर्न राबवायचा, हे आज सांगणार नाही. कारण, आज त्याबाबत बोललो तर ज्या गोष्टी करायच्या, त्या कशा होतील?,’ असे भाष्य करत खासदार सुजय विखे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीबाबत सस्पेंस कायम ठेवला. राज्यातील निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती पाहता आता नगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, … Read more

राष्ट्रीय महामार्ग 222साठी संपादित जमिनीमुळे बाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ – खा. सुजय विखे पा.

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रीय महामार्ग 222च्या यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी 2018 मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी संपादित करताना कुठलाही विचार न करता त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. यामध्ये काही क्षेत्र बागायती, काहींच्या फळबागा अशा अनेक जमिनी होत्या. या सर्व जमिनी सरसकट जिरायती दाखविण्यात आल्या. त्यामुळे अनेक त्रुटी आहेत. सदर त्रुटी शासनास … Read more

नव्या वर्षात नगरकरांसाठी खासदार सुजय विखेंचे आहे हे व्हीझन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- 2020 ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प आहे. तो यशस्वी होईल,’ असा विश्वास नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील नीलक्रांती चौकात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी खड्डेमुक्त नगरचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांची … Read more

…तर खासदार सुजय विखे देणार खासदारकीचा राजीनामा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे सुरू असलेले उपोषण अखेर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सुटले आहे. या कामगारांना तातडीने एक पगार देण्याचे आश्वासन डॉ. विखे यांनी कामगारांना आश्वस्त केले. थकीत पगार मिळावेत, प्रॉव्हीडंट फंड व ग्रॅज्युईटी मिळावी या मागणीसाठी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी तसेच … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या आरोपाबद्दल खासदार सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तनपुरे साखर कारखान्यास जिल्हा बँकेने विखे पिता-पुत्रांच्या मध्यस्थीमुळे कर्ज दिले आहे. पण कर्ज परतफेडीच्या करारानुसार कारखान्याकडून पैसे आले नसल्याने सुमारे ३० कोटींवर रक्कम थकल्याने बँकेने पैसे भरण्याबाबतची नोटीस कारखान्याला पाठवली होती. या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष गायकर व संचालक मंडळ सदस्य आणि राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी ‘तनपुरे’च्या थकीत … Read more

विखे पाटील पिता पुत्रांवर शिवाजी कर्डिले यांची जोरदार टीका केले हे वक्तव्य !

राहुरी :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत,तनपुरे साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून थेट विखे पिता – पुत्रांवरच त्यांनी आरोपांचा हल्ला केला आहे. फक्त लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याच्या राजकीय हेतूने विखे पिता-पुत्रांनी राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला होता काय, असा संशय येतो, असे वक्तव्य … Read more

खा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न  

अहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ चे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्या कडे केली. नगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ च्या चौपदरीकरणाविषयी मुद्दा खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित करून … Read more

उड्डाण पुलाच्या जागेसाठी भूसंपादन करण्यास संरक्षण मंत्र्याचा हिरवा कंदील!

अहमदनगर : शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून, येत्या दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्याना दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण … Read more

सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी – खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर: नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी संसदेत केली. हिवाळी अधिवेशनात नियम १९३ अन्वये कृषी विभागावरील चर्चेत डाॅ. विखे यांनी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यात अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी; विम्याची … Read more