Maharashtra Heat Wave : अरे देवा, पुन्हा येतेय उष्णतेची लाट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Heat Wave : गेल्या काही काळापासून वाढलेल्या उष्म्यातून आपेक्षित दिलासा तर मिळाला नाहीच, मात्र पुन्हा एकदा उष्णेची लाट येण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यास उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात ५ व ६ मे रोजी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील हवामान सक्रीय राहण्याची शक्यता आहे. आज व उद्या पुणे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पुढील दिवस, उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ ते ६ मे या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा उत्तर मध्य महाराष्ट्रात येतो. येथील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!