नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.
पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे.

खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यामुळे सुजय विखे यांना सुरेंद्र गांधीची अडचण होणार अशी चर्चा रंगत असतानाच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक खा गांधींची भेट घेऊन धक्काच दिला. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले.
दरम्यान खा गांधी यांनी आपण पक्षाशी एक निष्ठ असल्याचे सांगितले. पण त्या नंतर सुरेंद्र गांधीनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले होते.
खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज (दि.४) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाने खा.दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा.गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे.
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 3 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट ; महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत?
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ 18 हजार शाळा बंद केल्या जाणार ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती
- एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा निर्णय ! 5, 6 आणि 7 जुलै रोजी……
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का ?
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 20 हजार कोटी रुपयांचा मेगाप्रकल्प ! जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टरची दुरुस्ती होणार
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 4 जुलैपासून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या स्टेशनवर थांबणार?