अहमदनगर :- राजकारणामध्ये चढ – उतार चालू असतात. पक्षाने जरी मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही,
माझे तिकीट कापले मात्र तरीही नाराज न होता, न थांबता पक्षाचेच काम करणार हे मी जाहीर केले आहे.
पक्षविरोधी कृती करणे आमच्या रक्तात नाही. २००४ मध्येही पक्षाने माझे तिकीट कापले होते, तरीही पक्षाचेच काम केले,
असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी शनिवारी दिले.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शहर भाजपतर्फे लक्ष्मी कारंजा चौकातील कार्यालयात आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत मत की जय, वंदे मातरम्च्या जयघोषात या वेळी गांधींच्या हस्ते भाजप कार्यालयात गुढी उभारण्यात आली.
गांधी म्हणाले, कालपर्यंत काय झाले त्यावर आता चर्चा नको. आता उद्याच काय ते पाहू. दुसऱ्याने काय केले ते पाहण्यापेक्षा आपली रेष मोठी करू.
म्हणून न थांबता न थकता सर्वांनी पक्षाचे काम सुरू करायचे आहे. टीका टिप्पणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष आसाराम ढूस, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, राजेंद्र विखे, सरचिटणीस किशोर बोरा, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, जगन्नाथ निंबाळकर, विवेक नाईक, अजित फुंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
- मुलांचे शिक्षण,लग्न इत्यादीवर होणाऱ्या खर्चाचे टेन्शन सोडा! प्रत्येक महिन्याला 5 हजाराची गुंतवणूक 21 वर्षात देईल लाखोत पैसा
- व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी साधला संवाद
- Bank FD Interest Rate : 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, आताच करा गुंतवणूक…
- वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान
- Banking Rule Change : 1 मे पासून बदलणार ‘या’ बँकांचे नियम; वाचा सविस्तर…