अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे.

मात्र जैन समाजाचा अपमान झाल्याचे सांगत काही जणांचे माझ्यावरचे प्रेम उफाळून आले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली.
काही निर्णय राजकीय दुष्टीकोनातून घ्यावे लागतात. पक्षाने ते घेतले.त्यातून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली.पक्षाच्या या निर्णयाशी मी सहमत आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होते.
पत्रकार परिषदेसाठी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भैय्या गंधे, किशोर बोरा उपस्थित होते.
- ऐकून आश्चर्य वाटेल, पण पायलट आणि को-पायलट कधीच एकत्र जेवत नाहीत; यामागे आहे एक धक्कादायक सुरक्षा नियम!
- भारताच्या स्वदेशी तोफमुळे चीन-पाकला फुटला घाम; 1 मिनिटात 6 राऊंड आणि 46 किमीवर…; पाहा MGS आणि ATAGS ची खरी ताकद!
- इम्यूनिटीचा बुस्टर आहेत ‘या’ झाडांची पाने, केसांपासून हृदयापर्यंत मिळतात आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या खाण्याची पद्धत
- रिंकू सिंगसारखं यश तुम्हालाही मिळू शकतं, ‘या’ मूलांकला गुरु ग्रह देतो धन, प्रसिद्धी आणि मान! पाहा कोणत्या आहेत या भाग्यवान जन्मतारखा?
- भारतातील ‘या’ चमत्कारी मंदिरात देव स्वतः झाले होते प्रकट?, आजही मूर्ती दाबली की नाभीतून येते रक्त! कुठे आहे हे रहस्यमयी मंदिर?