अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.
पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ 3 बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- मोठी बातमी ! पुणे – अहिल्यानगर – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार ! कसा असणार 235 किलोमीटर लांबीचा नवा रूट ? पहा…
- जपानी लोक इतके शांत आणि यशस्वी का असतात?, नेमकी कशी असते त्यांची ‘शुकन’ लाईफस्टाइल?
- पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग मोहरीच्या तेलात ‘ही’ एकच गोष्ट मिसळून लावा! त्वरित होईल फायदा
- ‘या’ दोन मूलांकच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करून बसाल!