अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.
पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.
- IMDb 2025 : ‘छावा’ने बाजी मारली, तर ‘ड्रॅगन’ दुसऱ्या स्थानी; IMDb वरील टॉप-10 चित्रपटांची यादी जाहीर!
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार