अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले.
पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
कंठ दाटून आलेल्या अवस्थेत खा. गांधी यांनी कसेबसे आपले मत मांडले. यावेळी सभेतून खा. गांधी समर्थकांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता.
तर खा. गांधी यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा संदेशही सोशल मीडियावर गांधी समर्थकांनी पसरविला होता.
त्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. गांधी यांची चार भिंतीच्या आत माफी मागितली होती. यामुळे विखे व गांधी यांचे पॅचअप यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीच्या दिवशीच समोर येणार आहे.
- अहमदनगरमध्ये लोकसभेला आजवर २०१ उमेदवारांचे डिपॉझिट झालेय जप्त ! तीन मातब्बर खासदारांचाही समावेश, पहा इतिहास..
- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर ! आहार तज्ज्ञांनी सांगितली ही माहिती
- ‘या’ सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवा आणि मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सोडा! वाचा योजनेची ए टू झेड माहिती
- Ahmednagar Politics : शक्तिप्रदर्शन सुजय विखेंचे, ताकद दिसली जगताप-कर्डीले-कोतकरांची ! जावई सासऱ्यांचा करिष्मा काय करू शकतो? पहा..
- डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा; जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत मेळावा