राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.
शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- पहिल्याच दिवशी शिर्डीसाठी 31 अन नगर दक्षिणसाठी 42 अर्जांची विक्री; खा. सुजय विखे, तनपुरेसह ‘यांनी’ घेतलेत अर्ज
- Ahmednagar News : नगर शहरात महिला पोलिसाला मारहाण, पहा काय घडला प्रकार
- Ahmednagar News : उद्योजकास शेतात गाठले, चाकू दाखवत खंडणीची मागणी, अहमदनगरमधील घटना
- आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?
- माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ? डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात