राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.
त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.
रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
- 25 वर्षे पाण्याचा प्रश्न मिटणार ! शिवधनुष्य उचललं सुजय विखेंनी, आता गाव पाण्याच्या संकटातून मुक्त होणार
- खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात ! नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नाही…
- नेवासा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरावरील ऊस जळून खाक, आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान
- राहुरी तालुक्यात मोटारसायकलवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले, दोघांवर गुन्हा दाखल
- कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान