अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.


मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्याच काहीशी वाढ झाली होती.

तापमानाचा पारा वाढताच उकाडा ही प्रचंड वाढला आहे. उकाडा वाढला असताना शनिवारी नगर शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगरकर घामाघूम झाले होते.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे