अहमदनगर :- भाजपचे सुजय (दादा) विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम (भय्या) जगताप यांच्यात झालेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आता तर निकालाच्या दोन दिवस आधीच दादा आणि भय्या यांच्यावर लाखो रुपयांचा सट्टा लागला आहे. दादा आणि भय्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच.

शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
मात्र, तोपर्यंत जिल्हाभरातील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निकालासाठी अवघे काही तास उरलेले आहेत.
बुधवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. गावागावात, चौकाचौकात, कॉलेज कट्टे एवढेच नाही, तर घरोघरी निकालावर चर्चा झडत आहेत.
अनेकांनी पैंज लावलेली आहे. कुणी पार्टी देण्याची, तर कुणी रोख रक्कम देण्याची पैंज लावलेली आहे. शेवटचे दोन दिवस दोन्ही उमेदवारांवर बुकींकडे लाखो रुपयांचा सट्टा लागलेला आहे.
तरुण मतदार, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, राजकारणाची आवड असणारे, कामगार, नोकरदार असे अनेकजण या सट्ट्याला बळी पडले आहेत. एक हजार रुपयांपासून, तर एक लाख रुपयांपर्यंत हा सट्टा लावण्यात आला आहे.
- मुकेश अंबानी यांचे अँटिलिया नाही तर ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक महागडे घर ! 400000000000 रुपयांच्या सर्वाधिक महागड्या घराचा मालक कोण?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 25,000 रुपयांची गुंतवणूक करा मॅच्युरिटीवर मिळणार 6 लाख रुपये !
- पुण्यात तयार होणार 3 नवीन रस्ते ! हिंजवडी आणि मुळशीमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, कसे असणार नवीन रोड ?
- अहिल्यानगर पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई ! मावा तयार करताना पकडला गेला, पण झाला फरार!
- शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल