संगमनेर :- बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरास संगमनेर तालुक्यातील नांदुरी येथे घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१७ रा. नांदुरी दुमाला) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राज्यात आज बारावीचा निकाल जाहिर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परिक्षा दिली होती. बारावीत नापास झाल्याने सौरभला नैराश्य आले.
त्याने नांदुरी येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी सौरभला बाहेर काढून घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
- मयत व्यक्तीच्या ‘या’ वस्तू चुकूनही वापरू नका ! नाहीतर….; मयत व्यक्तींच्या वस्तूंबाबत गरुड पुराण काय सांगत पहा?
- आमदार संग्राम जगताप यांना संरक्षण द्या, अन्यथा या जिहादी प्रवृत्तींना धडा शिकवण्याचं काम आम्ही करू, धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- अहिल्यानगरमध्ये मोहरमच्या दिवशी तब्बल ४४० जणांना शहरातून करण्यात येणार हद्दपार, पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त
- अहिल्यानगर जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
- रोजच्या डाएटमध्ये ‘हे’ 5 नैसर्गिक पदार्थ करा अॅड, शरीराला मिळेल भरपूर प्रोटीन!