मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.
याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले.
तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.
- अहिल्यानगरमधील भोरवाडीमध्ये यात्रेनिमित्त हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थित रंगला शर्यतीचा थरार
- IMDb 2025 : ‘छावा’ने बाजी मारली, तर ‘ड्रॅगन’ दुसऱ्या स्थानी; IMDb वरील टॉप-10 चित्रपटांची यादी जाहीर!
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश