अहमदनगर :- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे.

आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत.
पुत्र सुजय विखे यांना लोकसभेचे तिकीट न दिल्यानंतर झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपासून विखे आणि कॉंग्रेस पक्षामध्ये काहीशी फुट पडली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळविला होता.
दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट, रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी
- श्रीगोंदा पोलिसांचा साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटख्यावर छापा, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोघांवर गुन्हा दाखल
- तब्बल 25 वर्षांनी टीव्हीवर परतणार’तुलसी’, पण तिच्या रिअल लाईफ लव्ह स्टोरीने चाहत्यांना केलं भावुक! वाचा स्मृती इराणी यांची प्रेमकथा
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ह्या’ गावात विकसित होणार ! नवी मुंबई एपीएमसी पुन्हा स्थलांतरित
- अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेने तीन महिन्यांपासून कचरा न उचलल्यामुळे घनकचरा कर माफ करावा, माजी नगरसेवक निखील वारे यांची मागणी