श्रीगोंदा :- तालुक्यातील 35 गावांसाठी जीवनदायी ठरणारी साकळाई योजना पूर्ण तत्त्वास व्हावी, या मागणीसाठी दि.9 ऑगस्ट रोजी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पटांगणात अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साकळाई देवीचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली जाणार आहे. साकळाई योजनेचे आतापर्यंत निवडणूक लढण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.
खासदार सुजय विखे यांनीही हा मुद्दा निवडणुकीपूर्वी घेतला होता यापूर्वीच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही सकाळी योजनेचा मुद्दा फक्त निवडणुकीत काढला परंतु परंतु योजना पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला नाही.
या योजनेचे पन्नास वर्षापासून राजकारण चालू आहे योजना पूर्ण व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री यांना उपोषणा पूर्वी भेटणार आहोत साकळाई योजनेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील गावांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार नसेल तर त्यासाठी आम्ही प्रशासनाला पर्याय सुचविणार आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात हा विषयी मार्गी लागू शकत नाही. परंतु ही योजना होण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.
- 1.50 लाखात तुम्हीही बनणार स्वतःच्या बिजनेसचे मालक ! महिन्यासाठी होणार 60 हजाराची कमाई, सुरु करा ‘हा’ व्यवसाय
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनेत एकदा पैसे गुंतवा अन महिन्याकाठी कमवा 5550 रुपये ! वाचा सविस्तर
- Nilesh Lanke Property : साडेचार वर्षात कमी झालेल्या संपत्तीबददल निलेश लंकेंनी स्पष्टच सांगितलं ! समाजासाठी काम…
- उद्योजकांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा ! गावागावात जाणार