शिर्डी :- लोणीपासून चार किलोमीटर अंतरावर गोगलगाव (ता. राहाता) येथील ७४ वर्षांच्या शेतकऱ्याने नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. बाबा महादू मगर असे त्याचे नाव आहे.
संगमनेर रस्त्यावर गायकर लवणात त्यांची दोन एकर जमीन आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हायटेक (सोना) ५१०१ कंपनीचे हायब्रिड मका बी पेरले होते. हे बी उगवले नाही, म्हणून मगर चिंतातूर झाले. या नैराश्यातून त्यांनी शनिवारी राहत्या घरी टिकटाँक हे गोचिड मारण्याचे विषारी औषध सेवन केले.
मुलांनी त्यांना प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मगर यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी आहे.
- Loksabha 2024 : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता येण्यापासून कुणी रोखू शकत नाही…
- Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेतून शिवसेनेच्या मातब्बर नेत्याने भरला खासदारकीचा अर्ज ! आघाडीत बिघाडी की बंडखोरी? विखे, लंकेंपुढे आव्हान
- Top Cow Breed In India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाईच्या जाती! वाचा वैशिष्ट्ये आणि गाईंची किंमत
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? ‘या’ ठिकाणी ७ दिवसात ३ मृतदेह सापडले
- उन्हाळ्यातील गर्मीत फिरा झारखंडमधील काश्मीर! झारखंड मधील ‘हे’ ठिकाण सिमला आणि मनालीला देखील पाडते फिके