अहमदनगर :- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात चोमेवाडी परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी रोहिणी नवनाथ निंबाळकर (चोमे) हिने माहेरचे नातेवाईक मामा यांच्याकडून शेतीचे कामाकरिता व दुकानासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करुन तुला घरातील काम नीट येत नाही. तू येथे राहू नको, तसेच नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर याला दुसरी बायको करुन दे, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
या छळास कंटाळून रोहिणी निंबाळकर या विवाहित तरुणीने शेतातील शेततळ्यातील पाण्यात उडी घेतली व त्यात ती बुडून मयत झाली. याप्रकरणी मयत रोहिणीचे मामा दत्तात्रय लक्ष्मण हरगुडे, रा. केसनंद हवेली पुणे,
यांच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसांत आरोपी नवरा नवनाथ सुभाष निंबाळकर, सासरा, सुभाष दगडू निंबाळकर, दीर संतोष सुभाष निंबाळकर (चोमे), जाव उषा संतोष निंबाळकर (चोमे) सर्व रा. बेलवंडी, चोमेवाडी, श्रीगोंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- इंडिया किंवा फक्त हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 12 नावांनी ओळखला जातो भारत देश! फक्त बुद्धिमान लोकांनाच माहित असतील ही प्राचीन नावे
- भारताची नवी रणनीती! सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील ‘हा’ प्रकल्प पाकिस्तानला हादरवणार
- गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात ‘हे’ अन्नपदार्थं खाणं टाळाच, बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो गंभीर परिणाम!
- रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कोण पाहतो?, जाणून घ्या GRP आणि RPF यांच्यातला फरक आणि जबाबदाऱ्या!
- अर्जुनाचं ‘गांडिव’ आता हवाई लढाईत! चीनच्या PL-15 पेक्षा प्रगत क्षेपणास्त्र भारताकडे, मॅक 4.5 वेगाने करणार हल्ला