शेवगाव- पावसा अभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्क्यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.
तालुक्यातील आव्हाणे बु. येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काका नरवडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, पं. स. सदस्या मनिषा कोळगे, सरपंच संगीता कोळगे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, ऍड. विनायक आहेर, डॉ. सुधाकर लांडे, नारायण बैरागी, रघुवीर उगले, वसंत भालेराव, उपसरपंच सुधाकर चोथे, शिवाजी आहेर आदी प्रमुख उपस्थित होते.
- राज्य गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य – राधाकृष्ण विखे पाटील
- उन्हाळ्यामध्ये घरातील दूध 24 तास ताजे ठेवायचे असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स! नाही नासणार दूध
- संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा
- Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! लोकशाही नव्हे तर, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आले…
- महाराष्ट्र सरकार देणार व्यवसायासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! काय आहे वसंतराव नाईक कर्ज योजना? वाचा पात्रता व अटी