अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.
कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.
- ‘या’ जन्मतारखेच्या मुली पार्टनरसाठी ठरतात ‘लकी चार्म’, आयुष्यात येताच नशिब फळफळतं!
- ‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?
- मुमताजच्या स्मरणार्थ…ताजमहालच्या शिखरावर असलेली ‘ही’ वस्तू आहे खास! अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य
- जुलै महिना ठरणार लकी ! 28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार
- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने दिली स्थगिती, रहिवाश्यांना दिलासा