सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो.
प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हात धुतात, असेएका अहवालातून समोर आले आहे. उर्वरित लोक आपल्या आरोग्याबाबत उदासीन असतात.

प्रत्यक्षात बाथरूम, स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुणं गरजेचं असतं. आपण तिथल्या फ्लशचा वापर करतो. नळाला हात लावतो. या ठिकाणी असंख्य बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपल्या हाताना चिकटतात आणि रोगराईला कारणीभूत ठरतात.
हात धुण्यामुळे आपण जवळपास १४ विकारांना लांब ठेऊ शकतो. आजारपणं टाळण्यासाठी आपल्याला फक्त ४० ते ५० सेकंद द्यायचे असतात. एवढ्या वेळेत आपण हात स्वच्छ धुवू शकतो. स्वच्छतागृह सार्वजनिक असो किंवा घरातलं, नियमित हात धुणं गरजेचं आहे.
- UIDAI चा नवा नियम! 3 वर्षे वापर नसेल तर आधार डिअॅक्टिवेट होईल, पुन्हा अॅक्टिव करायचं असेल तर? जाणून घ्या प्रोसेस
- भारताचे पहिले ISS अंतराळवीर शुभांशू शुक्लाची एकूण नेट वर्थ किती?, आकडा आला समोर!
- भारतातील नंबर 1 चा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी खर्चून फक्त 60 हजार कमावले! ‘या’ अभिनेत्याने साकारली होती मुख्य भूमिका
- राजीव गांधी हत्या प्रकरणावर आधारित वेब सिरीजने मारली बाजी, OTT वरील टॉप 5 सिरीजची यादी!
- फक्त 1 रुपयात मिळेल इंजिनिअरिंग डिग्री, ‘या’ युनिव्हर्सिटीकडून मुलींसाठी क्रांतिकारी योजना सुरू! जाणून घ्या अधिक