अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबाजी शिंदे हे मनपाच्या आरोग्य विभागातील कोंडवाडा विभागात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते.
कामामध्ये आरोग्य विभागाची असुरक्षितता असल्याने मनपाच्या हंगामी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपाकडून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण नगण्य आहे.
जरी एखादा रूग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने बाधीत आढळला तर त्यावर साध्या पध्दतीने उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. नागरिकांनी पूर परिस्थिती भागास तसेच साथीचे आजार फैलावलेल्या भागास भेट देण्याचे टाळावे, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
- भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांची ‘ही’ यादी वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! ब्रह्मोस ते तेजस, सगळं येथे जाणून घ्या!
- फक्त भारतच नाही, ‘या’ देशांमध्येही गुंजतो ‘हर हर महादेव’चा जयघोष! जाणून घ्या परदेशातील प्रसिद्ध मंदिरं
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पटसंख्या टिकवण्यासाठी संघर्ष, इंग्रजी शाळांकडे कल वाढल्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
- ‘या’ अंकाचे लोक सोन्यासारखं नशिब घेऊन जन्मतात; त्यांची मैत्री म्हणजे करोडपती होण्याची संधी! जाणून घ्या त्यांचे गुण आणि स्वभाव
- अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ संघटनेचा इशारा