कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती
- अहमदनगर ब्रेकिंग : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह ! उजव्या हातात…
- अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
- अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीतून गहू चोरीला ! चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
- Ahmednagar Politics Breaking: उमेदवार उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, आमचं लग्न असलं तरी तुमचीही सुपारी आहे, विसरू नका !