नेवासा – चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप पिकांची पेरणी केली. मुळा व भंडारदरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाटपाणी मिळून पिके जगण्याची आशा होती.

त्याचवेळी तालुक्यात पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवरून दोन्हीही धरणांतून एक महिन्यापूर्वी आवर्तन सोडण्यात आले. यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील साठवण बंधारे व तलाव भरून शेतीलाही मुबलक पाणी देण्यात आले; मात्र या दोन्ही धरणांच्या आवर्तनातून नेवासा तालुका अद्यापही वंचित आहे.
त्यामुळे पिके जळून गेली आहेत. ‘टेल टू हेड’ हा नियम अत्यंत तकलादू आणि नेवासा तालुक्याची क्रूर चेष्टा करणारा ठरला आहे. ‘मुळा’ व ‘भंडारदरा’च्या आवर्तनांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे. आवर्तन काळात मुळा धरण्याच्या हेडला असलेल्या राहुरी तालुक्यातील बंधारे, तलाव भरून शेतीलाही पाणी देण्याचा प्रकार होत आहे.
शेतकऱ्याच्या कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यांना आधार देण्याची जबाबदारी शासनाची असून पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- UIDAI चा नवा नियम! 3 वर्षे वापर नसेल तर आधार डिअॅक्टिवेट होईल, पुन्हा अॅक्टिव करायचं असेल तर? जाणून घ्या प्रोसेस
- भारताचे पहिले ISS अंतराळवीर शुभांशू शुक्लाची एकूण नेट वर्थ किती?, आकडा आला समोर!
- भारतातील नंबर 1 चा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी खर्चून फक्त 60 हजार कमावले! ‘या’ अभिनेत्याने साकारली होती मुख्य भूमिका
- राजीव गांधी हत्या प्रकरणावर आधारित वेब सिरीजने मारली बाजी, OTT वरील टॉप 5 सिरीजची यादी!
- फक्त 1 रुपयात मिळेल इंजिनिअरिंग डिग्री, ‘या’ युनिव्हर्सिटीकडून मुलींसाठी क्रांतिकारी योजना सुरू! जाणून घ्या अधिक