नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते.
पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
- Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाखाली पुरला
- खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल
- AIATSL Pune Bharti 2024 : 10 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी रहा हजर…
- ठरलं तर ! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज…
- मोदीना पंतप्रधान बनविण्यासाठी सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदारला निवडून पाठवायचे !