जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आनला.
येथे डॉ.युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या वेळी संदेश कोठारी, दत्ता वराट, खंडु कवादे यांनी मदत केली. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 3 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट ; महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत?
- चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!
- अहिल्यानगर न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या ५० सदनिकेसाठी तब्बल ६४ कोटींची मंजूर, आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले