निंबेनांदूर : तालुक्यातील नवीन नेतृत्व देण्याची हर्षदा काकडे यांची तयारी आहे. परंतु तुमची साथ हवी असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ॲड शिवाजीराव काकडे यांनी शहरटाकळी येथे केले.
काल शहर टाकळी येथे जनशक्ती विकास आघाडी जनसंपर्क दौरा वेळी दहिगाव गणाची बैठक शहरटाकळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण गोरे हे होते.

यावेळी आबासाहेब राऊत, रामनाथ पिसोटे, सूर्यकांत गवळी, डॉ.गोरे, राजेंद्र इथापे, शेषराव आपशेटे, अशोक दातीर, मच्छद्रिं टेकाळे, देवराव दारकुंडे, कुमार फसले, विष्णू दिवटे ,भारत भालेराव, मच्छद्रिं आर्ले, भागचंद माळवदे ,
ज्ञानदेव खराडे, मनोज घोंगडे, शिवाजीराव शेळके, सदाशिव जाधव, विकास गवळी ,भास्कर ठोंबळ, नवनाथ फासाटे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. यावेळी ॲड. काकडे म्हणाले की दोन-तीन घरातच अदलून बदलून तालुक्याची सत्ता आहे.
सत्तेचा उपयोग यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी केलेला नाही, फक्त स्वत:चा विकास यांनी साधला तालुक्यातील कोणतेही भरीव असे काम यांचे नाही त्यामुळे जनतेने आता यांना ओळखलं पाहिजे. तुमची खंबीर साथ असल्यास कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवू असेही काकडे म्हणाले.
- इंजीनियरिंगला ऍडमिशन हवंय ? स्वातंत्र्यापूर्वी स्थापित झालेल्या ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी
- ‘या’ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर मिळणार 9.10 टक्क्यांचे व्याज ! कोणत्या बँकेने आणली नवीन योजना? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! यावेळी ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, थकबाकीचाही लाभ मिळणार
- एलपीजी ग्राहकांसाठी कामाची बातमी! आता ‘या’ ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाही
- मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?