कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर टिका केली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी-आघाडीच्या सरकारनेच शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने वाटोळे केले. आघाडीच्या कारकिर्दीत मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भरीव कामे झाली.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने भाजपानेच न्याय दिला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व मिळाले आहे. जम्मू काश्मिर मधील 370 कलम हटवून भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला.
देशाला नरेंद्र मोदी व राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाची खरी गरज आहे. लोकसभेत ज्या प्रमाणे आघाडीचा धुव्वा उडाला त्याच प्रमाणे विधानसभेतही आघाडीचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम दावा त्यांनी केला.
कर्जत-जामखेडचे विरोधी संभाव्य उमेदवार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. निवडणुक काळातच ते मतदार संघात फिरता आहेत. निवडणूक संपली की ते मतदार संघातून गायब होतील अशी टिका त्यांनी केली.
- तब्बल दहा वर्ष न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या याचिका कर्त्याला अखेर मिळाला न्याय !
- लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात ! ‘या’ एप्लीकेशनवरून ऑनलाईन अर्ज करता येणार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस कशी असणार ?
- नगरकर झालेत घामाघूम, तापमानाचा पारा 39.82 अंश सेल्सिअसवर ! ‘या’ तालुक्यात अवकाळीची हजेरी, आज पावसाचा येलो अलर्ट
- अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात सामील ‘त्या’ काँग्रेसी नेत्याचे अखेर निलंबन
- डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी ! भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ…