कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही.
कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला.
हे केवळ २०१४ ला केलेल्या चुकीमुळे झाले असून २०१४ ला केलेली चूक पुन्हा करून नका, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे चासनळी, धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
आशुतोष काळे म्हणाले, चासनळी परिसरातील धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांमध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी यांचे प्रश्न मार्गी लावून
या परिसरातील शेतकऱ्यांना आपला माल लासलगाव, बसवंत पिंपळगाव आदी ठिकाणी घेऊन जाता यावा यासाठी चासनळी येथे मोठा पूल बांधला. त्यामुळे या परिसरात दळणवळण वाढलेले आहे.
- Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता शून्य होणार की 50% च्या पुढे वाढत राहणार ? समोर आले नवीन अपडेट
- सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?
- National Insurance Academy : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…