सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आज आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हे जनतेला दिवास्वप्न दाखवत सुट आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- धक्कादायक! भारतीय महिलांमध्ये 300% नी वाढलाय हृदयविकाराचा धोका, पुरुषांपेक्षा लक्षणे असतात पूर्णतः वेगळी
- श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी नक्की करावीत ‘ही’ 7 कामे; शिव-गौरीच्या कृपेने पतीचं आयुष्य वाढेल आणि संसारात येईल सुख!
- इंस्टाग्राम वापरताय? मग ‘ही’ सेटिंग लगेच बंद करा; अन्यथा सगळी प्रायव्हेट माहिती थेट हॅकर्सच्या हाती!
- जिओ आणि एअरटेलचे 84 दिवसांचे दमदार प्लॅन! रोज 3GB डेटा, OTT अॅक्सेस आणि…; पाहा कुणाचा प्लॅन ठरतोय दमदार?
- नेटफ्लिक्स फॅन्ससाठी धमाकेदार आठवडा! रोमान्सपासून थ्रिलरपर्यंत 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान येणाऱ्या सर्व रिलीज यादी पाहा