न्यूयॉर्क : आजपासून सुमारे २६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला सामूहिक विनाशाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान संपूर्ण पृथ्वीवरून जीवजंतू गायब झाले होते आणि यासोबतच भूगर्भीय आणि बाह्य कारणांमुळे पृथ्वीवर सामूहिक विनाशाच्या घटनांची संख्या सहावर पोहोचली होती.
एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मिशेल रेम्पिनो यांनी सांगितले की, सामूहिक विनाशाच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर आतापर्यंत कितीवेळा अशा विनाशाला सामोरी गेली आहे, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

रेम्पिनो यांनी सांगितले की, याआधीच्या अध्ययनांतून असे लक्षात येते की, सामूहिक विनाशाच्या सगळ्या घटना पर्यावरणीय उलथापालथीमुळे झाल्या होत्या. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पूर व ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडल्या होत्या.
यामुळे पृथ्वीवर लाखो किलोमीटरपर्यंत लाव्हा पसरला होता. परिणामी पृथ्वी जीवजंतूविहीन झाली होती. याआधी शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिक विनाशाच्या घटना झाल्या आहेत.
त्यामुळे मोठ्या संख्येने अनेक जीवांच्या प्रजाती नष्ट झाल्या. भूशास्त्रज्ञांनी सामूहिक विनाशाच्या कालखंडाचे ऑर्डोविनशियन (४४.३ कोटी वर्षांपूर्वी), लेट डेवोनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी), पर्मियन (२५.२ कोटी वर्षांपूर्वी), ट्रायसिक (२०.१ कोटी वर्षांपूर्वी) व क्रेटेशियस (६.६ कोटी वर्षांपूर्वी)असे वर्गिकरण केले आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, आजी अनेक प्रजाती विलुप्त होण्याच्या उंबरठ्यावर असून पृथ्वीचे तापमानही सातत्याने वाढत आहे. समजा ही प्रक्रिया थांबली नाही तर लवकरच आपल्या सातव्या सामूहिक विनाशाचे साक्षीदार व्हावे लागेल.
- इंडिया किंवा फक्त हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 12 नावांनी ओळखला जातो भारत देश! फक्त बुद्धिमान लोकांनाच माहित असतील ही प्राचीन नावे
- भारताची नवी रणनीती! सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील ‘हा’ प्रकल्प पाकिस्तानला हादरवणार
- गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात ‘हे’ अन्नपदार्थं खाणं टाळाच, बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो गंभीर परिणाम!
- रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कोण पाहतो?, जाणून घ्या GRP आणि RPF यांच्यातला फरक आणि जबाबदाऱ्या!
- अर्जुनाचं ‘गांडिव’ आता हवाई लढाईत! चीनच्या PL-15 पेक्षा प्रगत क्षेपणास्त्र भारताकडे, मॅक 4.5 वेगाने करणार हल्ला