जामखेड : गेल्या ५० वर्षांत जे काम झाले नाही ते तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षांत करुन दाखवले. आता फक्त तरुण पिढीला कायमस्वरूपी हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी कर्जत तालुक्यातील सुत गिरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
आगामी काळात जामखेड तालुक्यातील एमआयडीसी व मोठ मोठे उद्योग येथे सुरू करण्यात येणार आहेत. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृत्वाखाली भाजपची सत्ता असून महाराष्ट्रात देखील पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तुमची साथ आणि आशीर्वादाची गरज आहे. असे मत पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील दिघोळ माळेवाडी येथे पालकमंत्री ना.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी ते ग्रामस्थांशी बोलत होते.
यावेळी हभप रामकृष्ण रंधवे बापू महाराज, तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, उद्योजक राजेंद्र देशपांडे, सरपंच केशव वनवे, नंदू गोरे, विश्वविजेते पै.राहुल आवारे यांचे पिताश्री पै.बाळासाहेब आवारे, माजी पं.समिती सदस्य मनोज राजगुरू, गहिनीनाथ गीते, उपसरपंच सुनील रंधवे, पवन जाधव, मिठू राऊत,
अंबादास आवारे,लक्ष्मण माने, भीमराव तागड, नवनाथ मुसळे, बाळू दगडे, हनुमान पोतदार,राहुल टाळे,सागर जाधव,डॉ.नवनाथ गिरी,मधुकर आवारे, डॉ.बनकर, हरिदास आवारे, विठ्ठल विधाते, संभाजी विधाते,अनिकेत राजगुरू, विठ्ठल आवारे, कैलास आवारे, शिवाजी तळेकर, जितेंद्र गवळी, बप्पा आवारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण
- Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?
- ज्या तत्परतेने नागरिकांचे अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही? आमदार हेमंत ओगलेंनी सभागृहात सरकारला धरले धारेवर
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय,महाराष्ट्र बँकेचे होणारे स्थलांतर अखेर थांबले, गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
- चारचाकी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून एसटी चालकाला तिघांनी शिवीगाळ करत केली मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल