अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी बाबूराव घोरपडे (रा.शिराळ चिचोंडी) यांना राजीव माथूर (पूर्ण नाव माहित नाही),अमित त्रिपाठी, राजीव मल्होत्रा, राजेंद्र यादव, राजीव नारायण शर्मा,चमन अग्रवाल,निर्मल शर्मा, विशाल शर्मा (पूर्ण नाव माहित नाही).

यांनी संगनमत करून डॉ.घोरपडे यांना तुमच्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे टावर बांधायचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्शुरन्स उतरावा लागेल.असे सांगून घोरपडे यांना विविध बॅकांच्या खात्यात वेळोवळी पैसे भरण्यास भाग पाडले.
डॉ.घोरपडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ऑगस्ट २०१५ ते २० ऑगस्ट २०१९ या काळात विविध बँकाच्या खात्यात एकूण ३० लाख ३५ हजार ५३१ रूपये भरले.वरील आठ जणांनी हे सर्व पैसे काढून घेतले तसेच अद्यापही आपल्या जागेवर टावर उभे करण्याच्या कोणत्याही हालचाली होत नसल्याचे लक्षात आल्याने डॉ.घोरपडे यांना आपल्या फसवल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी याबाबत पाथर्डी पोलिसांत वरील आठजणांविरूध्द फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार हे करत आहेत.
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ 3 बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- मोठी बातमी ! पुणे – अहिल्यानगर – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार ! कसा असणार 235 किलोमीटर लांबीचा नवा रूट ? पहा…
- जपानी लोक इतके शांत आणि यशस्वी का असतात?, नेमकी कशी असते त्यांची ‘शुकन’ लाईफस्टाइल?
- पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग मोहरीच्या तेलात ‘ही’ एकच गोष्ट मिसळून लावा! त्वरित होईल फायदा
- ‘या’ दोन मूलांकच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करून बसाल!