नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल