बैठे काम करणार्यांना मरण लवकर येते का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बैठे काम हे आपल्यासाठी आवश्यकच झाले आहे, कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण, बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय करतात, यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे.

रामदास स्वामींनी म्हटले आहे, ”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” आपण हा कायदा पाळत तर आहोतच, पण जरा जास्तच प्रामाणिकपणाने पाळत आहोत आणि थांबायला तयार नाही, पण आपण आता कामाच्या निमित्ताने एवढे एका जागी बसत आहोत की, बसल्या जागी काम केल्यानंतर थोडे उठा, चालायला लागा. आता तर फार बसला, तो संपला, असे सांगावे लागणार आहे..

अधिक काळ कामासाठी एका जागेवर बसणारे लोक लवकर मरण पावण्याची शक्यता आहे.

जे लोक एकाच जागेवर सलग एक किंवा दोन तास बसतात त्यांच्या बाबतीत मृत्यूचा धोका अधिक आहे. मात्र, एक किंवा दोन तास बैठे काम करताना अधूनमधून उठत असतात आणि दर अध्र्या तासाला बसल्या जागेवरून उठून चालत असतात, काही हालचाल करीत असतात तर ही लवकर मरण पावण्याची जोखीम तुलनेने कमी आहे. 

तेव्हा आपण किती तास बसता, याला महत्त्व आहेच. पण, त्यापेक्षा सलग किती वेळ बसता आणि उठबस करण्याचे वेळापत्रक कसे आहे, याला महत्त्व आहे. सांगायचे झाले तर बैठे काम करणे अपरिहार्यच असेल तर ते करणे भागच आहे, पण ते करताना दर अध्र्या तासाला उठावे आणि चार पावले चालावे.

Leave a Comment