मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता महालक्ष्मीच्या लाला लजपतराय कॉलेजमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती.
मात्र, मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीचा बालेकिल्ला आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणातून उतरवण्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात सेनेला यश आले होते. मात्र, आता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास आदित्य यांना वरळीत कितपत आव्हान निर्माण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
- आ.निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा, विधानसभा अध्यक्षांना पाठवला राजीनामा.. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढवणार
- PM Surya Ghar Yojana: घराच्या छतावर सोलर रूप-टॉप बसवा आणि 300 युनिट वीज मोफत मिळवा! अशा पद्धतीने करा घरबसल्या अर्ज
- Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद
- SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास