संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- इंस्टाग्राम वापरताय? मग ‘ही’ सेटिंग लगेच बंद करा; अन्यथा सगळी प्रायव्हेट माहिती थेट हॅकर्सच्या हाती!
- जिओ आणि एअरटेलचे 84 दिवसांचे दमदार प्लॅन! रोज 3GB डेटा, OTT अॅक्सेस आणि…; पाहा कुणाचा प्लॅन ठरतोय दमदार?
- नेटफ्लिक्स फॅन्ससाठी धमाकेदार आठवडा! रोमान्सपासून थ्रिलरपर्यंत 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान येणाऱ्या सर्व रिलीज यादी पाहा
- कचरा डेपोमुळे संगमनेरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तातडीने उपायोजना करण्याची आमदार खताळांची विधानसभेत मागणी
- नेवासा तालुक्यात जुन्या वादातून टोळक्याची तरूणाला बेदम मारहाण, हवेत गोळीबार करत जीवे ठार मारण्याची धमकी