अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे नगर शहर मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार अनिल राठोड यांना सोमवारी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने चित्र स्पष्ट झाले.

‘गुलाल घेऊन या आणि कॅबिनेट मंत्रिपद घेऊन जा’, असा शब्दही ठाकरे यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे चुरशीची लढत पहायला मिळेल.
राठोड येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने स्थानिक सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
काहीही झाले, तरी जगताप यांना सेनेत प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी राठोड यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले होते.
मात्र, आता राठोड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने या सर्व राजकीय वावड्यांना खीळ बसली आहे. उध्दव ठाकरे यांनी सोमवारी राठोड यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला.
त्यामुळे नगर शहर मतदारसंघाचे राजकीय चित्र स्पष्ट झाले. मागील निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने राठोड यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
सेनेकडून राठोड, राष्ट्रवादीचे जगताप, भाजपचे अभय आगरकर व काँग्रेसचे सत्यजित तांबे असे चौघे एकमेकांच्या विरोधात लढले होते.
त्यात सेना-भाजपची युती तुटल्याचा फायदा झाल्याने राष्ट्रवादीचे जगताप निवडून आले होते. आता पुन्हा राठोड व जगताप यांच्यात थेट लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी राठोड यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राठोड पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात जगताप व अन्य उमेदवार कोणती रणनिती वापरणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
- मुमताजच्या स्मरणार्थ…ताजमहालच्या शिखरावर असलेली ‘ही’ वस्तू आहे खास! अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य
- जुलै महिना ठरणार लकी ! 28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार
- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने दिली स्थगिती, रहिवाश्यांना दिलासा
- 2026-30 पर्यंत भारताच्या तिन्ही दलात सामील होणार ‘ही’ 5 शक्तिशाली शस्त्र! पाहा प्रत्येक शस्त्राची खासियत
- आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका, पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन