इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणाऱ्यांची चौकशी होत नाही. मात्र ज्या संस्थेचा संचालक वा सभासदही नाही अशा प्रकरणात माझे नाव गोवले जाते. काय चौकशी करायची ती करा, ‘लय बघितल्यात’ काळजी करायचे कारण नाही, असा इशारा महायुतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. भाजपाचे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
ते इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते.. शरद पवार म्हणाले, सरकारला शेतक ऱ्यांची किंमत नाही. तरूणांची बेरोजगारांची संख्या, महागाई वाढतच चालली आहे. सरकार चालवताना शेतकरी हिताची काळजी घ्यावी लागते. युवकांच्या हातांना काम देण्यासाठी धोरण आखले पाहिजे.
या पातळीवर या सरकारची कामगिरी पाहता सर्वत्र नैराश्य पहायला मिळते. ते म्हणाले, शिखर बँक प्रकरणी इतर पक्षातील संचालक असताना अजित पवार यांचेच नाव घेतले जाते. इतरांचे नाव घेतले जात नाही. बारामतीतील साखर कारखान्याचा सभासद असताना माझे नाव ही घेतले गेले. हा सारा प्रकार दडपशाही राजकारणाचा आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना किंमती ठरवण्याचा अधिकार नाही. सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु वाळवा तालुक्यात एकही आत्महत्या झाली नाही हे खऱ्या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. जयंतरावांच्या या प्रचाराच्या शुभारंभाचा विजयी संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवणार आहे.
- अहमदनगर : तब्बल 2 महिन्यांपासून शहरातील ‘या’ भागात वावरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला, वनविभागाला मोठे यश
- काळजी वाढवणारी बातमी ! पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस हजेरी लावणार
- अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?
- केवळ मोदीच! डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री
- Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स! सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत या पदांसाठी निघाली भरती