मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.
पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.
पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
- Gold Rate: गेल्या 2 महिन्यात तब्बल 11 हजार रुपयांनी महागले सोने! त्यामुळे आता सोने खरेदी करावे की अजून वाट पहावी? वाचा तज्ञांचे मत
- Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगमध्ये करोडोंची फसवणूक, गुंतवणूकदार आक्रमक, लुटारूंची प्रॉपर्टी जप्त करून गुन्हे दाखल न केल्यास मतदानावर बहिष्कार
- Hill Station: भारतातील ‘हे’ हिल स्टेशन आहे स्वर्गाइतके सुंदर! उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की भेट द्या आणि उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव घ्या
- Ahmednagar News : लेकरू शेततळ्यात पडलं..आईने ओढणी फेकली..तीही हातून निसटली अन पोटचा गोळा डोळ्यादेखत बुडाला…
- हॉस्पिटलमधील खर्चासाठी पैसा अपूर्ण पडला तर ‘ही’ बँक धावेल मदतीला! वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणली नवी योजना