अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.
भाजप, शिवसेना, रा.स.प., रिपाइं या महायुतीच्या वतीने भाजपने वैभवराव पिचड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल गुरुवारी पिचड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत पिचड बोलत होते.

आ. पिचड म्हणाले, राज्य बदलतयं, देश बदलतोय, आपणही बदलावे आणि विकासाच्या या उत्सवात सामील व्हावे, यासाठीच आपण भाजपत प्रवेश केल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. अकोल्याच्या विकासासाठीच आपण पक्षांतर केले असल्याचे ते म्हणाले.
- पारनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, ९० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अन् कानातील सोनं ओरबाडत केली बेदम मारहाण
- नागपूरच्या मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवले, मात्र गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या शेवगावच्या एकाविरोधात गुन्हा दाखल
- अहिल्यानगरमध्ये भरधाव डंपरने एकास चिरडले, तरूणाचा जागीच मृत्यू तर डंपरचालक अपघातानंतर झाला पसार
- महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचनाची क्षमता वाढवण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहिल्यानगरच्या महानगरपालिकेत तब्बल ३५० कोटींचा घोटाळा, आमदार संग्राम जगतापांचाही हात असल्याचा राऊतांचा आरोप