नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. वायनाड या मतदारसंघापुरतंच ते स्वत:ला सीमित ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकससभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मात्र दुसरीकडे राहुल गांधी नाराज असल्याचे देखील समजते.

राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच जे निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचे होते ते देखील घेतले दिले जात नव्हते असेही सूत्रांकडून कळले आहे.
राज्यात एकीकडे शरद पवार निवडणूक प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळते आहे. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच मैदानात उतरणार असल्याची माहिती होती. 2 ऑक्टोबरला वर्ध्यातील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करणार होते, मात्र ते तिथंही आले नव्हते.
- अहिल्यानगर न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या ५० सदनिकेसाठी तब्बल ६४ कोटींची मंजूर, आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
- अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा