नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.
नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नगरकरांनी मला संधी दिली.
नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.
- Maharashtra Politics : पक्षफुटीमुळे दोस्त दोस्त न राहा.. ! आधी केला ज्यांचा विरोध, ज्यांनी हरवले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ, पहा ‘गमती’पूर्वक लढती
- Ahmednagar News : चार मुलांचा बाप बनला सैतान ! मुलीवर केला अत्याचार, त्यानंतर..
- वयाच्या 66 व्या वर्षी सुरु केलेला सोनालीका ग्रुप आज आहे 25 हजार कोटींचा! वाचा लक्ष्मीदास मित्तल यांचा एलआयसी एजंट ते उद्योजक असा प्रवास
- 9 Seater Car: महिंद्राने भारतात लॉन्च केली धमाकेदार वैशिष्ट्यांसह नऊ सीटर SUV कार! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
- शिर्डी राजकारणात खळबळ उडवणाऱ्या उत्कर्षा रुपवते कोण आहेत? आजोबा होते कॅबिनेटमंत्री, डॉ. आंबेडकरांशी खास कनेक्शन, वडिलांचीही राजकीय पार्श्वभूमी, पहा..