श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.
समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.

त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये श्री. मुरकुटे बोलत होते.
मुरकुटे म्हणाले, सन १९९९ मध्ये केलेली चूक आता भोगावी लागत आहे. सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. तालुक्याच्या हक्काचे पाणी गेले.
शेती उजाड; तर शेतकरी उद्ध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर व गोरगरीबांचा रोजगार गेला.
पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडल्याची भिती आहे. या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास साथ द्या.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 5 जुलैला चालवली जाणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘ह्या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार
- पैसे कमावायचे असतील तर श्रीमंत लोकांच्या ‘या’ सवयी आजच अंगीकारा; आयुष्य बदलून जाईल!
- पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?
- श्रीरामपूर तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांच्या शेतातून चोरले दोन गुंठे गवत
- Jackfruit Day : हाय ब्लड प्रेशर, पचन ते हृदयरोग… फणसाचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!