श्रीगोंदा : बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे दोन्ही तालुक्यातील नेते एकत्र आल्याने गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्याचे विकासपर्व सुरु होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी प्रश्नात नागवडे -पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे मत नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले.
बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ शहरातून फेरी काढली होती. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी पाचपुते यांच्या पाठीशी उभे रहा. श्रीगोंदा शहराचा सर्वांगिण विकास व शहरातील विविध विकासकामासाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला .
मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले.पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
- घर खरेदीदारांचा मनस्ताप संपणार ! जाणून घ्या पार्किंगचा नवा नियम
- Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता शून्य होणार की 50% च्या पुढे वाढत राहणार ? समोर आले नवीन अपडेट
- सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?