चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.
मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? युवकास कारमधून पळवले, त्यानंतर मारहाण केली, नंतर…
- Bank Holiday April 2024 : 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान इतके दिवस बँका बंद राहतील बँका; पाहा सुट्ट्यांची यादी
- बेसुमार वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ! अधिकारी फोनच उचलत नाहीत…
- Ahmednagar News : तरुणाला मारले, पुरावा संपवण्यासाठी दगडात पुरला मृतदेह .. पोलिसांनी २४ तासात लावला छडा
- धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत ! मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. लोखंडेंना साथ द्या