चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- इंजीनियरिंगला ऍडमिशन हवंय ? स्वातंत्र्यापूर्वी स्थापित झालेल्या ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश घ्या, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी
- ‘या’ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर मिळणार 9.10 टक्क्यांचे व्याज ! कोणत्या बँकेने आणली नवीन योजना? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! यावेळी ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, थकबाकीचाही लाभ मिळणार
- एलपीजी ग्राहकांसाठी कामाची बातमी! आता ‘या’ ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाही
- मुंबई ते खानदेश दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! तयार होणार नवा मार्ग, सरकारचा मास्टर प्लॅन काय सांगतो ?